फलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीफलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय महानुभाव भोपे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील ब. मठपती यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनानुसार, फलटण येथे महानुभाव पंथाची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ९ एप्रिल २०२६ रोजी समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान देवाची पालखी आबा साहेब मंदिर, दगडी पूल, श्रीकृष्ण मंदिर आदी मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल होत असल्याने शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात यात्रामार्गांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यांवरील वीज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच गजानन चौक ते आबासाहेब मंदिर हा रस्ता नव्याने तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून यात्रेचे नियोजन सुरळीत पार पाडावे, अशी अपेक्षा महानुभाव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. करण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय महानुभाव भोपे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील ब. मठपती यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनानुसार, फलटण येथे महानुभाव पंथाची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ९ एप्रिल २०२६ रोजी समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान देवाची पालखी आबा साहेब मंदिर, दगडी पूल, श्रीकृष्ण मंदिर आदी मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल होत असल्याने शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात यात्रामार्गांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यांवरील वीज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच गजानन चौक ते आबासाहेब मंदिर हा रस्ता नव्याने तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून यात्रेचे नियोजन सुरळीत पार पाडावे, अशी अपेक्षा महानुभाव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.


























