ब्रेकिंग न्यूज
*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.**सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल**अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत | पुणे बातम्याशहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊसपाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत* *झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ* *उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार* *जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने* *आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली*. **सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.*’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का आठवला.मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान
अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या (शासकीय, निमशासकीय व खाजगी) प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या तालुक्यांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून सखल भागात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा धोकादायक ठरू शकते. तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. संबंधित सर्व शाळा प्रशासनाने आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.