Homeताज्या बातम्याभेलके महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

भेलके महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

पुणे भोर दि.२७| भेलके महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जाणीव निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विवेकपूर्ण आढावा घेण्याची प्रेरणा देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे संकलन नसून ते देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, असे सांगितले. त्यांनी सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संविधानिक मूल्ये जपण्याची जबाबदारी तरुणांवर अधिक असल्याचे अधोरेखित केले.यावेळी प्रा. सहदेव रोडे यांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क व कर्तव्ये यांचे संतुलन राखण्याची गरज स्पष्ट केली. तर प्रा. लांडगे संदीप यांनी आजच्या काळातील आव्हाने, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, नागरिकांची भूमिका यावर भाष्य करून विद्यार्थ्यांना सजग आणि जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थिनी दिव्या मालुसरे हिने संविधानामुळे मिळालेले समानतेचे अधिकार, शिक्षणाची संधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल मनोगत व्यक्त केले. तिने तरुण पिढीने संविधान समजून घेऊन त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात करणे किती आवश्यक आहे, हे प्रभावीपणे मांडले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रा. जाधवर दयानंद यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. रोहिदास ढाकणे प्रा. सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.भगवान गावित , प्रा जीवन गायकवाड, प्रा.संदीप लांडगे,प्रा. दयानंद जाधवर, प्रा. महेश कोळपे प्रा.माउली कोंडे, डॉ. गणपत आवटे, प्रा.भूषण समगीर, प्रा. अंकिता महांगरे, प्रा.वैष्णवी कोंडे , विकास ताकवले, शिवाजी सोनावणे, श्री. महेश दळवी, सीमा देशमुख उपस्थित होते. सुमित कांबळे आणि अभिषेक मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. कोंडे माऊली यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....
error: Content is protected !!