Homeताज्या बातम्या*इतिहासाची तोडफोड थांबवा; पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचला — फलटणच्या साहित्यिकांचा आवाज*

*इतिहासाची तोडफोड थांबवा; पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचला — फलटणच्या साहित्यिकांचा आवाज*

इतिहासाची तोडफोड थांबवा; पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचला — फलटणच्या साहित्यिकांचा आवाज

 

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण

 

महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि देशाला दिशा देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची भूमी असून, या समृद्ध वारशाचे जतन करणे ही आजची मोठी गरज आहे. मात्र अलीकडच्या काळात इतिहासाचे विकृतीकरण आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास या दोन गंभीर समस्या समाजासमोर उभ्या ठाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचा ठाम सूर फलटण येथे झालेल्या ३८ व्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात उमटला.

 

साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन आणि वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात साहित्यिकांनी आपली खंत व्यक्त केली. इतिहास सांगताना अभ्यास आणि जबाबदारी आवश्यक असून, कोणत्याही थोर युगपुरुषांचा अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 

तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीचे प्रमाण चिंताजनक असून, “दिवसाढवळ्या झाडांची कत्तल” होत असल्याबद्दल उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

फलटणच्या साहित्यिक संवादाच्या माध्यमातून इतिहास संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. समाज परिवर्तनाच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचेही मत मांडण्यात आले.

 

कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले, संयोजक ताराचंद्र आवळे, पर्यावरणप्रेमी सुधीर इंगळे, सचिन जाधव, महादेवराव गुंजवटे, प्रा विकास शिंदे, प्रमोद सस्ते, ॲड. रोहिणी भंडलकर, श्रेयस कांबळे, अतुल चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी आपली मते मांडली.

 

यावेळी ताराचंद्र आवळे संपादित ‘युवा स्पंदन’ या स्मरणिकेचे तसेच प्रा. विक्रम आपटे लिखित ‘प्रभाव’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. विक्रम आपटे, विनायकराव ननावरे, अतुल चव्हाण ,शुभम रणदिवे, विक्रम भांडवलकर, आप्पासाहेब तांबे, सविता तांबे, योगेश गंगतीरे, मयूर शेरखाने, गणेश गुळवे, राजकुमार काकडे, अमोल जाधव, सचिन भांडवलकर यांच्यासह फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...
error: Content is protected !!