सातारा, दि. १९ इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडुन राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायमविनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणीक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या व्यवसायिक व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहेअसे विद्यार्थी या योजनेत पात्र आहेत.या योजनेतुन जिल्हयाच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस अनुक्रमे ४३ हजार व ३८ हजार या प्रमाणे लाभाचे वितरण करण्यात येणार आहे.या शैक्षणीक वर्षात एकुण १०५ विद्यार्थ्यांची या लाभासाठी निवड केली जाणार आहे. या योजनेचे अर्ज् भरण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी आपला अर्ज httts://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर भरावा व त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांचे कार्यालयात जमा करावी.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्यान,सातारा यांनी केले आहे.


























