सातारा दि.२३| स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. त्यास अनुसरुन ”स्वच्छता ही सेवा ”(SHS) मोहिम दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान अभियानाचे नियोजन करण्यात आलेले आहे. “एक दिवस,एक तास एक साथ, या श्रमदान उपक्रमात सर्व ग्रामस्थानी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन मॅडम यांनी केले आहे.
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2025 साठी “स्वच्छोत्सव ” ही थीम निश्चित केली आहे. खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
• दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवुन करण्यात आला आहे.
अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन सदर ठिकाणांची मॅपिंग करून त्या ठिकाणाची साफ़सफ़ाई करण्यात येत आहे.
• एक दिवस, एक तास, एक साथ – या महास्वच्छता उपक्रमां अंतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असुन, या उपक्रमात जिल्यातील सर्व गाव स्तरावरील सर्व घटकांना सहभागी करुन मोठ्या स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.अशी माहिती पाणी व स्वच्छतेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले मॅडम यांनी दिली आहे.
स्वच्छता ही सेवा 2025 अनुषंगाने
महास्वच्छता जिल्हयातील सर्व गावांमध्ये गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत” महास्वच्छता अभियान” राबविणेत येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, बचत गट प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, युवक यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. महा स्वच्छता अभियानामध्ये विविध उपक्रम घेणेत येणार आहेत.गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय ठिकाणांची स्वच्छता करणेत येणार आहे.
महास्वच्छता अभियान उपक्रमासाठी झाडू, कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेली इ. साहित्य व घंटागाडी उपलब्ध करणेत याव्यात तसेच गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावणेत यावी. अशी ग्रामपंचायत प्रशासनाने व्यवस्था करण्यात यावी.


























