सातारा : दि.१७| बौद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी दलित समाजाने साताऱ्यात मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात आंबेडकर स्मारकातून झाली. शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, रिपाई आठवले गट, पँथर सेना आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
























