फलटण| जाधववाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणारे अमोल दशरथ सस्ते हे आजच्या राजकारणात वेगळे ठरणारे नाव आहे. कारण आज शब्द देणारे अनेक आहेत, पण शब्दाला जागणारे मोजकेच. आश्वासनांचा बाजार मांडून मतांची मागणी करणाऱ्यांच्या गर्दीतून अमोल सस्ते ठामपणे उठून दिसतात कारण ते बोलत नाहीत, ते करून दाखवतात.
एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले अमोल सस्ते हे केवळ उमेदवार नाहीत, तर विश्वासाची हमी आहेत. गावकऱ्यांच्या अडचणी, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची वेदना आणि सामान्य माणसाचा आवाज त्यांनी नेहमीच स्वतःचा मानला आहे. कोणताही गाजावाजा न करता, कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी सातत्याने लोकांसाठी प्रामाणिक काम केले आहे.
आजचा युवक फक्त घोषणा ऐकत नाही, तो काम पाहतो. समाजकार्य करत असताना गोरगरीब जनतेला मदत करणे, मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो आरोग्य, शिक्षण, अडचणीच्या काळातील आर्थिक हातभार, नैसर्गिक आपत्तीत मदत किंवा अन्य सामाजिक प्रश्न ते नेहमीच पुढे राहिले आहेत. मदत करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी समाजाशी आपलं नातं घट्ट केलं आहे.राजकारण हे सेवा करण्याचं माध्यम आहे, सत्तेचा अहंकार मिरवण्याचं साधन नाही, ही भूमिका अमोल सस्ते यांनी कायम जपली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी, विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.आज जाधववाडी पंचायत समिती गणाला गरज आहे अशा नेतृत्वाची जे खोटं बोलत नाही,शब्द फिरवत नाही,संकटात पाठीशी उभं राहतं,आणि विकासालाच प्राधान्य देतं.हे सर्व गुण अमोल सस्ते यांच्यात स्पष्टपणे दिसून येतात.
म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत केवळ मत न देता, योग्य नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची वेळ आली आहे.
धनुष्यबाणाला मत द्या! शब्दाला जागणाऱ्या युवा नेतृत्वालाअमोल दशरथ सस्ते यांना साथ द्या!


























