सातारा :दि.१४| सातारा येथील होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुक केले आहे.
फडणवीस म्हणाले की, “ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांनी सरकारमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण त्यापेक्षा त्यांची साहित्यसेवा मोठी आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर त्यांनी लेखन केले असून, त्यांच्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण व कसदार साहित्यकृतीची निर्मिती झाली आहे.”
विश्वास पाटील यांच्या निवडीमुळे मला अतिशय आनंद झाल्याचे सांगून त्यांनी पाटील यांना आणि साहित्य संमेलनाच्या आयोजकांना अतिशय मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.


























