भोर दि.२०|सद्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे आणि ह्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर नवीन नवीन शोध राज्यभरात तसेच देशभरामध्ये लावून एक चैतन्यमय अविष्कार क्रांती घडवून आणून देशाला हातभार लावला पाहिजे असे उद्गार प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे अविष्कार स्पर्धा आयोजित केली होती त्याठिकाणी काढले. पुढे त्यांनी शेती, माहिती तंत्रज्ञान, नैसर्गिक अशा आपल्या आजूबाजूला वेगवेगळया समस्या किंवा साधने उपलब्ध आहेत त्यामधून समाजाला उपयोगी पडेल असे काहीतरी शोध लावून समाजामध्ये अविष्कार करायला हवा असे मत व्यक्त केले.
स्पर्धेचे उदघाट्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आयोजित महाविद्यालय स्तरीय स्पर्धेमध्ये कला, वाणिज्य आणि बीबीए (सीए) या विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. यावेळी केदार सोनके, प्रणय ओंबळे, सानिका पवार, प्रियांका जाधव साक्षी जगताप, योगिता मदने, वैष्णवी सोनवणे, प्रियांका कंक, जास्मिन शेख, समृद्धी बाटे, तनुजा देव, विकी कुमार, भारती खंडागळे, स्वप्नाली अहिरे, समीर बागल इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाविद्यार्थ्यांनी वेगवेगळे अविष्कार प्रकल्प सादर करीत त्याचे सादरीकरण केले, प्रकल्पामध्ये Pixal Diary, हरित कचऱ्यातून सौर पॅनल निर्मिती, मच्छर घालविण्यासाठी निरगुडीच्या पाल्यापासून धूप निर्मिती, घरगुती कचऱ्यातून गांडूळ खत निर्मिती, गाडीचा जॅक, विना इमेल इमेल सर्व्हिस , सोलर पॅनल, हायड्रोफोनिक गार्डन, चंद्रावरील ऑक्सिजन निर्मिती, दक्षिणी मराठीच्या समस्या व उपाय, सोशल मीडियाचा स्वास्थ्यावरील परिणाम, इ प्रकल्प सादरीकरण यावेळी करण्यात आले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. सहदेव रोडे यांनी आयोजन केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. जगदीश शेवते व डॉ.रोहिदास ढाकणे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.माऊली कोंडे, प्रा.भूषण सामगीर, प्रा.महेश कोळपे, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, प्रा.वैष्णवी कोंडे कार्यालयातील सीमा देशमुख, मनीषा मोहिते, अभिषेक मोरे, सुमित कांबळे यांचे सहकार्य लाभले.स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. संदीप लांडगे यांनी केले.


























