दि.२०| फलटण मिरगाव पासून १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या मिरगाव गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या टेकडीवर श्री वेताळबाबांचे मंदिर असून रविवार दि . २१/९/२०२५ रोजी रात्री ८ वाजता महाआरती चे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री हणमंतराव सरक ( आण्णा महाराज ) यांनी दिली .सर्वपित्री अमावस्येच महत्व सांगताना श्री हणमंतराव सरक ( आण्णा महाराज ) म्हणाले की सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो .या दिवशी पूर्वजणांना स्मरून त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवले जातात.
हिंदू धर्मामध्ये पितृपंधरावड्यांमध्ये सर्वपित्री अमावस्या या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे .कारण या पंधरा दिवसाच्या काळात पितृ लोकातून मृत्यू लोकांत जाण्यासाठी पित्रांना परवानगी असते अशी समजूत आहे .
त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या या दिवशी सर्व लोक आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करतात. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे पितृपक्षांमध्ये आपल्या पूर्वजांसाठी लोक श्राद्ध करतात आणि ज्या तिथीला पूर्वज मूत्यू पावलेले असतात त्यांचे त्या तिथीला श्राद्ध केले जाते पण जर आपल्याला पूर्वजांची मृत्यू तिथी माहित नसेल तर अशा सर्व पित्रांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केले जाते आणि त्याचबरोबर ती तिथी माहित आहे पण काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर तेव्हा ते देखील ते श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केले जाते म्हणूनच याला सर्वपित्री अमावस्या किंवा मोक्ष अमावस्या असे म्हणले जाते.
म्हणून ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी आपण सर्वांनी या महाआरती चा लाभ घेण्याचे व श्री वेताळ बाबांचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन सर्व भाविक भक्तांना करण्यात आले आहे.
महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


























