दि.२९| सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या एकसष्ठी निमित्त राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी फलटण शहरासह तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक , आरोग्य, सामाजिक धार्मिक आरोग्य शिबीरे व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते परंतु महाराष्ट्रा सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतीसह लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्याचे फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे, घरेदारे वाहून गेली आणि जवळ जवळ बावीस लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे जवळ जवळ दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंब ही उद्ध्वस्त झाली हे राज्यावरती जे भयंकर संकट कोसळले त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे अशा परिस्थितीमध्ये या सर्व कार्यक्रमास स्थगीती देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांचे एकसष्ठीचा कार्यक्रम पुन्हा मोठ्या स्वरूपात साजरा करणार असल्याचे माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी सांगितले.
संकट काळात मदतीला धावून जाणारे फलटणचे राजघराणे असून सांगलीच्या पुरस्थीती दरम्यान व इतर संकट काळात सामाजीक भान ठेवून मदत करणारे फलटणचे राजघराणे आहे. सध्याची परिस्थिती पाहता एकसष्ठीच्या कार्यक्रमाला स्थगिती देऊन राज घराणे व राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील संकटग्रस्त भागाला जनावरांचा चारा,धान्य,वस्त्र , कपडे, ब्लॅकेट जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर आर्थिक मदत आपल्या तालुक्याचे वतीने फलटणच्या नागरिकांनी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्याचे आवाहन माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले आहे.


























