सातारा दि.१ जिल्हयातील अंगणवाडी व शाळामध्ये जावुन आरबीएसके पथका मार्फत ० ते १८ वयोगटातील मुला व मुलींची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये गंभीर दोषी आढळुन आलेल्या बालकांना संदर्भीत करुन त्यांना आजारा नुसार पुढील औषधोपचार व शस्त्रक्रिया करुन निरोगी सुदृढ बनविण्यास मदत होत आहे. राज्यामध्ये शालेय स्तरावर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरत असल्याचे आरोग्य व अन्य संबंधित विभागांच्या निदर्शनास आले आहे. या शिबिरासाठी मुंबई येथील बालाजी हॉस्पीटल मधील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. श्रीपाल जैन आणि या सबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतीक मिश्रा उपस्थित होते.
























