अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५
सातारा दि. १३| स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून स्वच्छता ही सेवा (SHS) मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२५ साठी “स्वच्छोत्सव” ही थीम निश्चित केली आहे. खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत
१७ सप्टेंबर रोजी शुभारंभ – तालुका व गाव स्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून मोहिमेची सुरुवात होईल.
स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची मॅपिंग करून साफसफाई केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये स्वच्छता मोहीम होईल.
सफाईमित्र सुरक्षा शिबिरे – आरोग्य तपासणी शिबिरे, डिग्निटी कॅम्प आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सफाईमित्रांना मिळणार.
क्लीन ग्रीन उत्सव – पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सवाचे आयोजन.
प्रबोधनपर उपक्रम – स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड, प्लास्टिक संकलन केंद्र इत्यादीबाबत जनजागृती.
एक दिवस, एक तास, एक साथ – २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी श्रमदान, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांतील घटक सहभागी होतील.
विशेष ग्रामसभा – हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव घोषित करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करता येतील.
या मोहिमेतील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या https://swachhatahiseva.gov.in/ या विशेष IT पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असून त्याद्वारे शासनस्तरावरून थेट निरीक्षण केले जाईल, अशी माहिती पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले यांनी दिली.
स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानातील सर्व उपक्रम ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

























