साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
सातारा/प्रतिनिधी | दि.१७| “डॉ.बाबासाहेब आमची शान आहे आणि संविधान आमची जान आहे. त्यामुळे तरुणांनी संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच तयार राहिले पाहिजे,” असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी साताऱ्यात आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात केले.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आणि मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
संविधानाचे महत्व अधोरेखित
मोहनलाल पाटील म्हणाले, “भारतीय संविधान हेच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समानतेचा आत्मा आहे. त्यामुळे संविधानाची जागृती सर्व स्तरांमध्ये झाली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात चैत्यभूमी ते दीक्षाभूमी संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात येईल. या चळवळीत १८ पगड जातीतील तरुणांनी सामील होणे आवश्यक आहे.”
कार्यकर्त्यांचा सहभाग
या कार्यक्रमास राष्ट्रीय सहसंघटन मंत्री कैलासभाऊ जोगदंड, राजेश ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, संग्राम रोकडे, सुरेश पवार, सुनील ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, महिला अध्यक्ष दामिनी निंबाळकर, सुमित जगताप, नीतू खवळे, मनिषा सोनवणे, स्वाती गायकवाड, सुप्रिया येवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कैलासभाऊ जोगदंड म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात सुरू आहे. दादासाहेब ओव्हाळ यांच्या कार्यातून महाराष्ट्रात अनेक भीमसैनिक घडवले जातील. समाजासाठी सकस विचारांची चळवळ उभारल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.”
प्रमुख उपस्थिती आणि आयोजन
सातारा शहराध्यक्ष राजेंद्र होतकर, युवक शहराध्यक्ष शाहरुख शेख, सलीम बागवान, सलीम शेख, शाहिद कुरेशी, आशपाक शेख यांच्यासह वडार, धनगर, मुस्लिम बांधव यांचा मोठा सहभाग होता.
कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा अध्यक्ष विजय ओव्हाळ यांनी केले. कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमित मोरे, खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे, अध्यक्ष सनीदेव खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


























