Homeताज्या बातम्या*डॉ. आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले -प्रा.डॉ.प्रभाकर पवार*

*डॉ. आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले -प्रा.डॉ.प्रभाकर पवार*

डॉ. आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले -प्रा.डॉ.प्रभाकर पवार

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

समतेचा आग्रह धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदे,हक्क व अधिकार याद्वारे दलित,पीडित,वंचित, उपेक्षित,आदिवासी, भटकेविमुक्त व गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समूहांना व तमाम स्त्रीवर्ग यांना भारतीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना नवा चेहरा प्राप्त करून दिला.असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी भिलकटी ता.फलटण येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उद्योजक राजकुमार कांबळे होते .

“जय भीम तरुण मंडळ”, भिलकटी,ता.फलटण यांनी आयोजित केलेल्या “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”,कार्यक्रमात प्रा.डॉ. प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.शांताराम काळे,पत्रकार मुकुटराव कदम व सुशांत घनवट होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना,प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी भारत देशावर आजन्म प्रेम केले, ते निष्ठावंत मातृभक्त व देशप्रेमी होते. त्यांनी हजारो वर्षे विविध प्रकारच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले. त्यांना निर्भीड करून हक्क व अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा दिली.पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांच्या गुलामीला पारावर उरला नव्हता.यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहून, स्त्रियांना शिक्षण,ज्ञान,मताचा अधिकार,पदाधिकार,वारसाहक्क,घटस्फोट व सन्मानाने जगण्याचा कायदेशीर संविधानात्मक अधिकार दिला, ज्यामुळे स्त्री सन्मानित होऊन तिला कौटुंबिक व सामाजिक स्तरावर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. डॉ.आंबेडकरांचे हे कार्य कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य लढयाएवढेच मोठे होते. मानवी स्वातंत्र्यासाठी व मानव मुक्तीसाठी लढणारा सर्वोत्तम योद्धा म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे.आज भारतीयांनी त्यांच्या विचारांचा अंगिकार करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.असेही, प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी आव्हान केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी डॉ.आंबेडकरांच्या “शिका संघटित व्हा व संघर्ष करा”,या उक्तीचा स्वीकार करून, तरुणांनी आपली प्रगती करून समाजविकासाला महत्त्व दिले पाहिजे,असे सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना राजकुमार कांबळे म्हणाले, भारतीय समाजाने डॉ. आंबेडकरांचे सामाजिक व आर्थिक विचारांचा अभ्यास करून व्यवसायनिष्ठ बनून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले. पाहिजे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शांताराम काळे यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ स्त्री-पुरुष, युवक-युवती उपस्थित होते.

शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...
error: Content is protected !!