फलटण निरगुडी भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रा. श्रेयस कांबळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले.
प्रमुख वक्ते प्रा. श्रेयस कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. “योग्य व्यक्तीकडेच योग्य मार्गदर्शन मिळते, त्यामुळे चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते हनुमंत केंगार व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आयवळे यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक जोमाने राबविण्याची ग्वाही दिली. तर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रदीप मोहिते, ढवळ गावचे उपसरपंच गणेश गोरे, बापूराव केंगार, सुनील जाधव, ॲड. भोसले, ॲड. बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे अध्यक्ष सुरज गोरे यांनी मानले.
यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गोरे, निलकुमार गोरे, भिकाजी गोरे, सुनिल गोरे, अनिल गोरे, लहू गोरे, प्रविण गोरे, रघुनाथ गोरे, सागर गोरे, अमित आवटे, आदेश गोरे, देवराज गोरे, आदित्य गोरे, साईराज गोरे, शंभूराज गोरे, समीर गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिलावर्ग उपस्थित होते.


























