Homeताज्या बातम्याभारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन महिन्यांचा संविधान प्रसार प्रचार उपक्रम; शासकीय–निमशासकीय कार्यालये,...

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन महिन्यांचा संविधान प्रसार प्रचार उपक्रम; शासकीय–निमशासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालयांमध्ये दररोज कार्यक्रम घेण्याचे आवाहन — वैभव गिते

दि.२९|भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “संविधान अमृत महोत्सव – घर घर संविधान” हा भव्य उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत संविधान मूल्यांचा प्रसार, नागरिकांमध्ये जागरूकता आणि कर्तव्यांची भावना दृढ करण्यासाठी विविध लोकजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांना संविधानाची ओळख, त्यातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाण अधिक दृढ करणे हा आहे. मात्र शासन निर्णय जाहीर करून शासनाने आपली जबाबदारी पूर्ण झाली असे समजू नये, असे मत नॅशनल दलित मुहमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गिते यांनी व्यक्त केले आहे.

वैभवजी गिते म्हणाले की, “शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी संविधान प्रसार उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात या कार्यक्रमांकडे शासन व प्रशासनाकडून अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे.”

त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक गावात, तालुक्यात, कार्यालयांमध्ये, शाळा व महाविद्यालयांमध्ये रोज संविधान प्रसार कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे. शासन निर्णयाप्रमाणे कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित कार्यालयांना भाग पाडणे ही चळवळीतील कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. “दोन महिन्यांच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्यासच संविधान अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ अर्थपूर्ण पद्धतीने साजरा होऊ शकेल,” असे महाराष्ट्र राज्य सचिव वैभव गिते यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...
error: Content is protected !!