फलटण निरगुडी | दि.२८| वंचित, दुर्बल आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी सतत लढा देणारे, समाजातील न्यायहक्कासाठी ठामपणे आवाज उठवणारे, तसेच सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे निरगुडी गावचे माजी सरपंच राजेंद्र लकडे यांचा आज वाढदिवस आहे.
राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजपरिवर्तनासाठी असावे, या विचारांची जाण आणि अंमलबजावणी त्यांनी नेहमीच केली. गावपातळीवरील नेतृत्व करताना सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, वंचित घटकांना उभारी देणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि तरुण पिढीला प्रेरणा देणे हे त्यांचे कार्य लक्षणीय ठरले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीवीर उमाजी नाईक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारधारेवर चालत त्यांनी राजकारणात तसेच सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. यामुळेच ते आजच्या तरुणाईसाठी एक जाज्वल्य आदर्श ठरले आहेत.
निरगुडी व परिसरातील जनतेच्या मनात त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली असून त्यांच्याबद्दल आदर आणि आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.
त्यांच्या या सामाजिक वाटचालीला अधिक बळ मिळावे, त्यांनी अशीच लोकसेवा करत राहावी, तसेच त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजहितासाठी यशस्वी व मंगलमय ठरावा, हीच सर्वांची मनापासून शुभेच्छा..!!
श्री. राजेंद्र लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!


























