Homeताज्या बातम्यासंत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र...

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ७५५ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून ही सायकलवारी कार्तिक शुद्ध एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर वरून श्री क्षेत्र घुमाणकडे प्रस्थान करेल अशी माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री सुभाष भाबुरे यांनी दिली.

श्री सुभाष भाबुरे म्हणाले , श्री नामदेव दरबार कमीटी,भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २५०० किलोमीटरच्या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते .वारीचे हे ४ थे वर्ष आहे रविवार दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर २०२५ या दरम्यान या रथयात्राचे व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्तिक शुद्ध एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ व्या संजीवन समाधी सोहळा व गुरूनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराजांच्या पंढरपूर येथील जन्म स्थानावरून यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रम करणार आहे या सायकल यात्रेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडींग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकल पटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथयात्रा व सायकलवारी महाराष्ट्र सह गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निघणारी देशातील पहिली अध्यात्मिक सायकलवारी असून या वारीद्वारे भागवत धर्माच्या शांती समता आणि बंधुता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.

यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भीसे , संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास , पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे, सचिव अँड , विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे , राजेंद्र मारणे सल्लागार डॉ. राजगोपाल खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

0
पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

0
पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...
error: Content is protected !!