Homeताज्या बातम्यानिरगुडी गावातील नागरिकांचा संताप – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा...

निरगुडी गावातील नागरिकांचा संताप – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

फलटण | निरगुडी गावातील प्रलंबित प्रश्नांवर गावपुढाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर व मतदानावर गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.गावात वर्षानुवर्षे विविध मागण्या प्रलंबित आहेत. होलार समाजाला आजही हक्काचा रस्ता नाही, दलित वस्तीला २०१७ पासून संरक्षण भिंतीची मागणी असून जुलै २०२४ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. कापसे वस्ती ते निरगुडी रस्ता दयनीय अवस्थेत असून बौद्ध वस्तीतील नागरिक सुद्धा रस्त्यापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे लोंढे वस्तीतील नागरिक पुलासाठी अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत, पण आश्वासनापलीकडे काहीच झालेले नाही. तसेच धनगर व मातंग समाजाची समाजमंदिराची मागणी अद्याप अपूर्ण आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात विकासकामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे म्हणाले, “गावामध्ये श्रेयवाद, आडवा-आडवी, जीरवा-जीरवी आणि काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळेच पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत गावपुढाऱ्यांची उदासीनता स्पष्ट दिसते.”

दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत सोनवणे, निलेश गोरे, यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणून निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.गावकऱ्यांच्या या संतप्त भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत मोठे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...
error: Content is protected !!