फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण
आपण मियावाकी पध्दतीने ४५००० झाडांचा हा प्रकल्प वन विभागा मार्फत फलटण तालुका हरितक्रांती होण्याच्या दृष्टीने वनखात्याने उचललेले पहिले पाऊल आहे निकिता बोटकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने हा फक्त फलटण शहरात नव्हे तर आपण हा सगळा फलटण तालुक्यामध्ये हा राबवावा आणि फलटण तालुक्यामध्ये टेकड्या आहेत किल्ले आहेत वगैरे या सगळ्या ठिकाणी तो राबवला तर निश्चितपणे फलटण तालुका हिरवा गार व्हायला काही वेळ लागणार नाही असे मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी अटल आनंद घन वन प्रकल्पाचा शुभारंभ करताना केले
फलटणमध्ये ‘अटल आनंद घन वन प्रकल्पाचा’ शुभारंभ; १.५आपण मियावाकी पध्दतीने ४५००० झाडांचा हा प्रकल्प वन विभागा मार्फत फलटण तालुका हरितक्रांती होण्याच्या दृष्टीने वनखात्याने उचललेले पहिले पाऊल आहे निकिता बोटकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने हा फक्त फलटण शहरात नव्हे तर आपण हा सगळा फलटण तालुक्यामध्ये हा राबवावा आणि फलटण तालुक्यामध्ये टेकड्या आहेत किल्ले आहेत वगैरे या सगळ्या ठिकाणी तो राबवला तर निश्चितपणे फलटण तालुका हिरवा गार व्हायला काही वेळ लागणार नाही असे मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी अटल आनंद घन वन प्रकल्पाचा शुभारंभ करताना केले० हेक्टरवर ४५ हजार वृक्षांचे होणार रोपण
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने फलटण येथे ‘अटल आनंद घन वन प्रकल्पाचा’ शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. फलटण येथील वन विभागाच्या कार्यालयाशेजारील सुमारे १.५० हेक्टर क्षेत्रामध्ये तब्बल ४५ हजार वनझाडांचे रोपण करण्यात येणार असून, या ठिकाणी दाट आणि समृद्ध असे घनवन विकसित करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोप लावून करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देताना त्यांनी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी मानून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी वनक्षेत्रपाल निकिता बोटकर यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या उपक्रमांतर्गत स्थानिक हवामानाला पोषक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण विविध प्रजातींच्या वनझाडांची लागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ होणार असून जैवविविधतेचे संवर्धन, भूजल पातळी सुधारणा, तापमान नियंत्रण तसेच स्वच्छ आणि संतुलित पर्यावरण निर्मितीसाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरणार आहे. यावेळी वनपाल नितीन जगदाळे ,वनरक्षक आश्विनी लोखंडे,देवकी तहसिलदार, प्रियंका पालवे
कार्यक्रमास प्रा. सुधीर इंगळे, अॅड. कांचन कन्होजा खरात, सामाजिक कार्यकर्ते बापू बर्गे, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र बोंद्रे, ज्येष्ठ पत्रकार पोपट मिंड, पत्रकार अजय माळवे, योगेश गंगतिरे, गणेश भोईटे, सागर चव्हाण, प्रमोद सस्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय नेचर अँड वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, फलटणचे रवींद्र लिपारे, बिधिसागर निकाळजे, अनिकेत सोनवलकर, जयेश शेटे, श्रीनिवास भूजबळ, पायल चांडक, पंकज पखाले तसेच ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे सचिन जाधव, मंगेश कर्वे उपस्थित होते. फलटण वनविभागातील अधिकारी, वनमजूर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षारोपण केले.
उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्पही व्यक्त केला. फलटणमध्ये उभारला जाणारा अटल आनंद घन वन प्रकल्प हा केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, भविष्यात पर्यावरण शिक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणारे प्रेरणादायी केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जंगलांची घटती संख्या या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे घनवन प्रकल्प ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.


























